बंगळूर: केंद्राच्या सेफ सिटी (सुरक्षित नगर) योजना राज्यातील ५ महानगरांत राबविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारेन केंद्राकडे पाठविला आहे. यामध्ये बेळगावचा देखील समावेश असून बेळगावची निवड झाल्यास महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासह सबलीकरणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर होणार आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात बंगळूर महानगराची निवड करून सेफ सिटी योजना राबविली होती. आता राज्य सरकारने बेळगावसह मंगळूर, म्हैसूर, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी मध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे.
अद्याप या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळालेला नाही. पण, लवकरच पाच शहरांसाठी प्रत्येकी २०० कोटी रुपये निधीसह हा प्रस्ताव मंजूर केला जाण्याची शक्यता आहे. जूनमध्ये दिल्ली दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे हा प्रस्ताव ठेवला होता. त्याला केंद्राने सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव एस.आर.उमाशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
निर्भया योजनेअंतर्गत बंगळूर, अहमदाबाद, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, लकनऊ आणि मुंबई येथे राबविण्यात येत आहे. गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर शहरांच्या तुलनेत बेंगळुर ही योजना राबविण्यात आघाडीवर आहे.
काय आहे ‘सेफ सिटी’ योजना..
2२०१२ मध्ये दिल्लीतील भीषण बलात्कार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी २०१६ मध्ये निर्भया निधी अंतर्गत सेफ सिटी योजना राबविली. केंद्र आणि राज्य सरकारकडून ६०:४० अनुदानाच्या प्रमाणात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महिलांवरील अत्याचार-गुन्हेगारी, महिला सबलीकरण, जनजागृती कार्यक्रमांद्वारे पायाभूत सुविधांची निर्मिती, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि महिलांची सुरक्षेबाबतची क्षमता वाढवणे यासह या योजनेत विविध घटकांचा समावेश आहे.
बेंगळुरू, मंगळूर, म्हैसूर, हुबळी-धारवाड, बेळगाव आणि कलबुर्गी यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सेफ सिटी योजना लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, ज्याची केंद्राकडून पडताळणी सुरू आहे .-एस.आर. उमाशंकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव
Bus travel will become more expensive; there will be a 15 percent increase बेळगाव: शक्ती योजनेंतर्गत महिलांना बस प्रवास मोफत असला तरी इतरांसाठी बस प्रवास महागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव परिवहन मंडळाने सरकारकडे पाठविला आहे. सध्याच्या दरात १५ टक्के वाढ करण्याची आवश्यकता या प्रस्तावात व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बस तिकीट वाढविले नसल्याचे परिवहन […]
बेळगाव: आरोग्य क्षेत्रात पारिचारीकांची प्रमुख भूमिका असते. त्यांचे कार्य मोलाचे असते. त्यामुळेच या क्षेत्रातील कामकाज सोयीचे होते, असे मत डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले. त्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये आंतराष्ट्रीय नर्स (पारिचारीका) दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर मिनाक्षीताई रावसाहेब पाटील, डॉ. महादेव दिक्षीत आणि डॉ. माधुरी दिक्षीत उपस्थित होत्या. प्रसंगी आंतरराष्ट्रीय […]
समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट खानापुरात सध्या कांहीच अलबेल नाही. येथील शासकीय रुग्णालयाने कात टाकली असली तरी व्यवस्थेत कोणताच बदल झालेला नाही. उपचारापेक्षा इलाज भयंकर अशी येथील स्थिती आहे. लोकप्रतिनिधी तर ‘चमकोगिरी’त गुंतले आहेत. समाजसेवेची झुल पांघरलेले ‘दलाल’ सुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्याच्या समर्थणात उर बडवून घेणारेदेखील सर्वकांही अलबेल असल्याचा आव आणत नेतेगिरी […]
समांतर क्रांती / खानापूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडणुकीला उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. त्यामुळे नगरसेवकांची प्रतिक्षा संपली असली तरी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय व्यक्त केला आहे. पुन्हा इच्छूकांच्या उत्साहावर विरजन पडले आहे. Khanapur Nagar Panchayat President-Vice President Election नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष दोन्ही जागांसाठी सामान्य महिला आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे […]
बस प्रवास महागणार; १५ टक्क्यांची वाढ होणार
Bus travel will become more expensive; there will be a 15 percent increase बेळगाव: शक्ती योजनेंतर्गत महिलांना बस प्रवास मोफत असला तरी इतरांसाठी बस प्रवास महागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव परिवहन मंडळाने सरकारकडे पाठविला आहे. सध्याच्या दरात १५ टक्के वाढ करण्याची आवश्यकता या प्रस्तावात व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून बस तिकीट वाढविले नसल्याचे परिवहन […]