समांतर क्रांती / खानापूर Belgaum youth dies after drowning in swimming pool at resort near Kankumbi. कणकुंबीजवळील एका रिसॉर्टमध्ये जलतरण तलावात बुडून खासबाग-बेळगावच्या महांतेश अशोक गुंजीकर (२७) या तरूणाचा रविवारी मृत्यू झाला होता. तो अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्याचे वडील अशोक तम्मान्ना गुंजीकर यांनी व्यक्त केला आहे. तशी फिर्याद खानापूर पोलिसात नोंद झाली आहे. […]
समांतर क्रांती / विशेष भीमगड अभयारण्यातील गावांना शासकीय सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने १३ गावांच्या स्थलांतरासाठी कंबर कसली आहे. या गावांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देताना तेथील वन्यजीवन धोक्यात येणार असल्याची मखलाशी वनखात्याकडून केली जात आहे. दुसरीकडे वनखात्याने पर्यटकांसाठी जंगल सफारीची योजना आखली आहे. त्यामुळे वन्यजीव धोक्यात येणार नाहीत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नुकताच […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील पहिली पतसंस्था जांबोटी बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेच्या खानापूर शाखेचा रौप्य महोत्सव बुधवार दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ११.०० वा. होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव कृष्णाजी बेळगांवकर (संस्थापक अध्यक्ष) राहणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिपप्रज्वलन महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आमदार विठ्ठल सो. हलगेकर, श्री पिसेदेव […]
बेंगळुरू: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने (जेएसी) ३१ डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी भेट घेऊन २००० कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी निधीची तरतूद करण्यास सहमती दर्शविल्यानंतर संयुक्त कृती समितीने संपचा निर्णय मागे घेतला आहे. बस सुरू राहणार आहेत. एआयटीयूसीशी […]
समांतर क्रांती / जांबोटी खानापूर तालुक्यातील कणकुंबीजवळील रिसॉर्टमधील जलतरण तलावात बुडून तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (ता.२९) सायंकाळी घडली. या घटनेतील मृत महांतेश गुंजीकर (वय २७, रा.खासबाग-बेळगाव) हा बेळगाव येथील एका कंपनीचा कर्मचारी होता. याबाबतची अधिक माहिती अशी, मृत महांतेश हा त्याच्या कंपनीतील अन्य २२ कर्मचाऱ्यांसह पार्टीसाठी कणकुंबीजवळील रिसॉर्टमध्ये आला होता. सायंकाळी जलतरण तलावात […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्य नगरी समाजात कुणीच सुखी नाही. पैशामुळे माणूस अद्पदीत होतो. १३ व्या शतकात समाज असाच अद्पदीत झाला होता. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीत चार योग आहेत, त्यातील तीन अत्यंत कठीण आहेत. मात्र, भक्तीयोगामुळे माणूस निर्भय बनतो आणि निर्भयतेतच खरा आनंद असतो. निर्भयता आणि निरागसता आहे तेथे देव आहे, असे […]
माचीगड / दिवंगत अजित सगरे साहित्यनगरी गावाचं गावपण टिकविण्यासाठी आज साहित्य संमेलनांची गरज आहे. शहरातील संमेलनांना अनेक कंगोरे असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांनी भाषेचे महत्व जाणले. त्यांनी माणूस मांडला. तुकारामांनी त्यांच्या अभंगातून प्राणी, पक्षी, वनस्पती आणि निसर्गाचा व्यवहार मांडला. मातृभाषा ही जीवनाचा महामार्ग आहे. ती कुणाचीही मक्तेदारी नाही. भाषा कुणालाही शिकता येते. भाषा माणूस […]
समांतर क्रांती / साहित्य संमेलन विशेष तोंडाला पाणी लावून महाराष्ट्रीयन गेले इथल्यांनी सवतीचे सवतूर पोरं केले मलपुरीची कावेरी नक्कीच झाली असती विकासाची गंगा इथं हिरवं लेणं ल्याली असती इकडे आड, तिकडे विहीर मध्येच बसलंय आपलं पूर तरीही त्याच प्रतिक्षेत झक्क मारतंय खानापूर ! अनगडी येथील कवी संजीव वाटुपकर यांच्या खानापूर या कवितेतील ओळी खानापूरची चपखल […]
समांतर क्रांती / नंदगड माचीगड-अनगडी येथील सुब्रम्हण्य साहित्य अकादमीच्या २८ व्या साहित्य संमेलनाचे आयोजन उद्या रविवारी (ता.२९) करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूरचे साहित्यिक डॉ. बी.एम.हर्डिकर असून ते पहिल्या सत्रात अभिभाषण देतील. स्वागताध्यक्ष वास्तूवशारद पिटर डिसोझा हे उपस्थितांचे स्वागत करतील. गेल्या २८ वर्षांपासून माचीगड येथे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत महाराष्ट्र आणि गोव्यातील अनेक साहित्यिकांनी […]
समांतर क्रांती / खानापूर येथील भूविकास बँकेच्या आज शनिवारी (ता.२८) झालेल्या निवडणुकीत गर्लगुंजीतून विद्यमान संचालक विरुपाक्षी पाटील (बरगाव) यांचा एकतर्फी विजय झाला. तर कक्केरी मतदार संघात प्रकाश आंग्रोळी आणि निळकंठ गुंजीकर यांच्यात काँटे की टक्कर झाली. दोघांनाही समसमान १२ मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली, त्यात निळकंठ गुंजीकर यांना संचालकपदाची लॉटरी लागली. बँकेच्या १५ पैकी […]