समांतर क्रांती / खानापूर येथील भू-विकास बँकेची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची बनते. पण, यावेळी सर्वपक्षीयांच्या सहकार्यातून बँकेच्या १५ पैकी १३ संचालकांची निवड अविरोध करण्यात आली आहे. केवळ गर्लगुंजी आणि कक्केरी या दोन मतदार संघातील निवड अविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे शनिवारी (ता.२८) निवडणूक होणार आहे. अविरोध निवड झालेल्यांमध्ये विद्यमान चेअरमन मुरलीधर गणपतराव पाटील यांची भूविकास बँकेवर […]
समांतर क्रांती / खानापूर काल सोमवारी माणिकवाडीकडे गेलेल्या हत्तींच्या कळपाने पुन्हा रात्री सावरगाळीच्या शिवारात हैदोस घालून शेकडो टन ऊसाचा फडशा पाडला. सावरगाळी येथील ज्ञानेश्वर जायाप्पा पाटील यांना लाखोंचा फटका बसला आहे. रविवारी त्यांच्याच शेतातील पाण्याचा पंप, जलकुंभ आणि पिकांचे नुकसान हत्तींच्या कळपाने केले होते. गेल्या महिनाभरापासून गुंजी वनविभागात नऊ हत्तींनी ठाण मांडले आहे. या कळपाने […]
करंबळजवळ ट्रकचा, तर मलप्रभा ग्राऊंडजवळ दुचाकीचा अपघात समांतर क्रांती / खानापूर नंदगड रस्त्यावर करंबळजवळ ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २४) सहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर ट्रकचा समोरील भाग चाक्काचूर झाला आहे. सदर ट्रक नंदगडहून खानापूरकडे येत होता. दरम्यान करंबळ-कौंदलदरम्यानच्या वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने लाकूड वाहतूक करणारा […]
समांतर क्रांती / अळणावर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात तिघे ठार झाल्याची घटना अळणावर तालुक्यातील कटबगट्टीजवळ घडली. या अपघातात मृत झालेले तिघेही सौंदत्ती तालुक्यातील शिरसंगीचे आहे. हणमंत मल्लाड (३६), महांतेश चव्हाण (३७) महादेवप्पा हुलळ्ळी (३९) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी (ता.२३) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. ट्रक […]
समांतर क्रांती / कलारंग Shyam Benegal दिग्दर्शक शाम बेनेगल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी सोमवारी (ता. २३) रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने बॉलिवूड क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. श्याम बेनेगल यांचा जन्म १४ डिसेंबर १९३४ रोजी एका कोकणी भाषिक चित्रापूर सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. ते बारा वर्षांचे असताना त्यांचे छायाचित्रकार वडील श्रीधर बी. बेनेगल यांनी त्यांना […]
समांतर क्रांती / ब्यूरो रिपोर्ट शिक्षण क्षेत्रात टीकेचा विषय ठरलेला पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करून पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने अखेर रद्द केलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नो डिटेंशन पॉलिसी संपुष्टात आणली आहे. परिणामी, नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ढकलगाडी आता थांबणार आहे. आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना […]
समांतर क्रांती / खानापूरदेशातील प्रत्येक गावात वीज पोहचल्याची घोषणा केंद्रातल्या मोदी सरकारने दहा वर्षांपूर्वी केली. पण, खानापूर तालुक्यातील काही गावांना अद्यापही वीज पोहचली नाही. मेंडील या दुर्गम खेड्यात स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही वीज पोहचली नसल्याने हे गाव अंधारात चाचपडत आहे.मेंडील ग्रामस्थांनी आज सोमवारी (ता. 23) येथील हेस्कॉम कार्यालयाला धडक दिली. सात वर्षांपूर्वी मेंडील गावात विजेऐवजी सौरऊर्जेची […]
समांतर क्रांती / खानापूर हत्तींनी तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात अक्षरश: हैदोस मांडला आहे. रविवारी हत्तीने सावरगाळीतील शिवारात धुडगूस घालून शेती अवजारांसहीत ऊसाचे प्रचंड नुकसान केले. गेल्या आठवडाभरापासून हत्तीच्या कळपाचा या परिसरात वावर असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. नुकताच जळगे येथील मळणीच्या खळ्यावर हत्तीने धुडगू घातल्याची घटना ताजी असतांनाच सावरगाळी येथे त्याने दहशत माजविली आहे. […]
गावगोंधळ / सदा टिकेकर आता साहित्य संमेलनांचा सुकाळ सुरू होईल. तसा तो झाला आहे. मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनाची मक्तेदारी घेतलेल्यांनी त्यांच्या जिव्हांना आताश: धार लावली आहे. ते त्या पाजळण्यास तयार आहेत. समाज परिवर्तनाच्या (?) कार्यात ते आता कधी नव्हे ते गढून गेले आहेत. डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडी साहित्यिक – साहित्यरसिकांच्या गालांवर लाली आणून जाते न […]
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव-खानापूरचा हा परिसर खूप सुंदर आहे. सौदर्य सगळ्यानाच आवडतं, पण याच सौदर्यामुळे सीमावासीयांचे हाल होत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्ये या भागावर दावा करीत आहेत. भाषा आणि साहित्याच्या निवाऱ्यात राहून व्यवहार करायचा असतो, परंतु येथे निवाऱ्याबाहेर राहून व्यवहार करावा लागत आहे. परिणामी, अनेक पिढ्यांचे नुकसान झाले, ही भळभळती वेदना असल्याची […]