समांतर क्रांती / खानापूर आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. यावेळी तालुक्याचा निकाल ८५ टक्के लावण्याचे उद्दीष्ट खात्याने ठेवले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांनी ‘समांतर क्रांती’ला दिली. असे असेल नियोजन: परिक्षा केंद्र : ११ खानापूर शहरात मराठा मंडळ, ताराराणी हायस्कूल आणि सर्वोदय हायस्कूल ग्रामीण […]
समांतर क्रांती / विशेष अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचीवपदावर कार्य करणे साधेसुधे नाहीच. कारण, त्यासाठी अनेक राज्यांच्या समित्यांशी संबंध येतो, वेगवेगळ्या लोकांशी, विविध जाती – धर्माच्या लोकांशी, सर्वसामान्यांशी संबंध येतो. त्यासाठी प्रत्येक प्रदेशातील रुढी-परंपरा, तेथील संस्कृती समजून घेणे, प्रत्येक समाजात मिसळणे आगत्याचे ठरते. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय कमिटीच्या सचीव तसेच […]
समांतर क्रांती / नंदगड हलगा पंचायतीच्या अध्यक्षपदी सुनील मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोण अध्यक्ष होणार याबाबत सुरू असलेल्या चर्चेला विराम मिळाला आहे. अध्यक्षपदाची निवड जाहीर होताच फटाक्याची आतिषबाजी करून गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल खानापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून […]
समांतर क्रांती / विशेष रिपोर्ट कौलापूर वाडा हे गाव नक्कीच खानापूर तालुक्यात किंवा लोकशाहीवादी भारत देशात आहे का? असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गवळ्यांच्यावाड्यात सर्रास दिसतात ते गुरांचे गोठे. त्यामुळे माशांचा, डासांचा प्रादूर्भाव वाढून रोगराईने माणस मरूनच जातील, अशी स्थिती दिसत असली तरी प्रत्येक गवळीवाड्यावरील स्वच्छता अशी असते ही गोठ्यातही एकाद्याचे मन […]
बेळगाव: रंगपंचमीने रंगाने बेरंग केल्याच्या घटना काल जिल्ह्यातील दोन ठिकाणी घडल्या. यात घटनांत तीन चिमुकल्या शाळकरी मुलांना जीव गमवावा लागल्याने नको ती रंगपंचमी असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे. चिकोडीजवळील एकसंबा येथे रंगपंचमीनंतर विहिरीत पोहण्यास गेलेल्या वेदांत हिरकोडी (११) व मनोज कल्याणी (९) या दोघा मित्रांचा बुडून मृत्यू झाला. तर चिकोडी जवळीलच बारवाड येथे रंग […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर कोकणाची सोनेरी किनार लाभलेला खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट, त्यातच सह्याद्रीच्या कुशीत वसलेली खुराड्यासारखी गावं.. शिव छत्रपती आणि छत्रपती संभूराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेला ‘भीमगड’ आणि या किल्ल्याचा परिसर आज चर्चेत आहे. शापीत बनत चालेललं हे जंगल ‘माणसांनाच खायला उठलंय की काय?’ दोन दिवसांपूर्वी गवाळीच्या तरूणाने नेरसेजवळ जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. […]
समांतर क्रांती / स्पेशल रिपोर्ट तालुक्यातील राजकारणाने सध्या गय खाल्ली आहे. एकीकडडे तालुक्यातील सत्ताधारी भाजपाकडे कांहीच कार्यक्रम नाही; शिवाय सर्वसामान्यांच्या समस्यांशी त्यांना कांही देणे-घेणे राहिले नाही. त्याउलट काँग्रेसने मात्र भलतेच जोमात असल्याची प्रचिती गेल्या कांही महिन्यांपासून तालुकावासीयांना येत आहे. भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि त्यांच्या पक्षांच्या अपयशाचा आलेख दिवसेदिवस चढत चालला असतांना काँग्रेसींचा उत्साह मात्र […]
कालमणी शाळेचा अमृत महोत्सव उत्साहात समांतर क्रांती / जांबोटी शिक्षण माणसाला शहाणपण देते. गेल्या ७५ वर्षांपासून कालमणीची मराठी शाळा या परिसरातील लोकांना शहाण करीत आली आहे. त्यामुळे या शाळेचा अमृत महोत्सव साजरा होणे ही या शाळेच्या ॠणातून उतराईच आहे, असे प्रतिपादन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केले. नुकताच कालमणी येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला ७५ वर्षे […]
समांतर क्रांती / विशेष महाराष्ट्र राज्याला हादरा दिलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला आहे. आतापर्यंत किती मंत्र्यांनी आणिबाणीच्या काळात राजिनामे दिले. विशेषत: खानापूरशी संबंधीत तेलगी घोटाळ्यात (बनावट स्टँप) कुणाला राजिनामा द्यावा लागला होता? उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होणारा हा नेता कोण होता? संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून […]
समांतर क्रांती / विशेष खानापूर तालुक्याच्या विकासाचे ढोल वाजविणाऱ्या नेत्यांसनसनीत चपराक देणारी रस्त्यांच्या दुरवस्थेची आकडेवारी समोर आली आहे. तालुक्यात आजघडीला तब्बल १५२. ४० कि.मी. अंतराचे रस्ते कच्चे आहेत. रस्त्यांचा विकास केल्याचा डांगोरा पिटत सत्तेची पोळी चाखणाऱ्यांनी केवळ रस्त्यांच्या चिखलात लोळण्याव्यतिरिक्त कांहीच केले नाही, याची प्रचिती देणारी शासकीय आकडेवारी समोर आली आहे. जिल्हा पंचायतीकडून दर […]