कांही माणसं ध्येयवेडी असतात. आयुष्यात त्यांनी स्वत:चे लक्ष्य निश्चित केलेले असते. ते गाठण्यासाठी ते कोणतेही अग्नीदिव्य पार करण्यात कुचराई करीत नाहीत. आपली माणसं जपतानाच नात्या-गोत्यांचा लवाजमा आपल्या सभोवताली सांभाळून असतात. अशी माणसं जिवनात यशस्वी तर होतातच; शिवाय अशी माणसं पाठीमागे अविस्मरणीय अशा आठवणीदेखील सोडून जातात. असेच एक पितृतुल्य व्यक्तीमत्व म्हणजे मळव (ता. खानापूर) येथील नागाप्पा […]
समांतर क्रांती ब्युरो Devendra Fadnavis is the 21st Chief Minister; Who has held the post of Chief Minister of Maharashtra? महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी (५ डिसेंबर) शपतबध्द झाले. यापूर्वी त्यांनी राज्याचे आठरावे मुख्यमंत्री म्हणून ५ वर्षे १२ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यानंतर औटघटकेचे आणि पहाटेचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर नोंद आहे. […]
खानापूर तालुक्यात २५ वर्षात १५ जणांचा मृत्यू समांतर क्रांती विशेष / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात दोन –अडिच दशकापासून हत्ती आणि माणसांतील संघर्ष जणू इरेला पेटला आहे. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत एका खानापूर तालुक्यात हत्तींनी १५ जणांचा बळी घेतला आहे. दिवसे-दिवस जटील बनत चालेल्या हत्ती समस्येबाबत शासन-प्रशासनाने ‘गेंड्याचे कातडे’ पांघरलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून दहा हत्तींनी […]
समांतर क्रांती / खानापूर जून महिन्यापासून विज्ञान शिक्षक नाही, त्यामुळे या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. जवळपास मार्च-एप्रिलदरम्यान परिक्षा होणार आहेत. असे असतांना तात्काळ शिक्षकाची नियुक्ती करण्याऐवजी ३१ मार्चपर्यंत शिक्षक देऊ असे आश्वासन येथील शिक्षणाधिकाऱ्यांनी देत जणू अकलेचे तारे तोडले आहेत. विशेष म्हणजे शिरोली येथील आंदोलनकर्त्यांनीदेखील त्यांच्या या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले आहे. परिणामी, आंदोलन […]
भात पिकांचे नुकसान; तालुकाभर उच्छांदसमांतर क्रांती / खानापूरदोन दिवसांपूर्वी भटवाडा-कामतगा परिसरात मुक्त संचार करणाऱ्या हत्तीच्या कळपांनी आता माणिकवाडी परिसरात मोर्चा वळविला आहे. मंगळवारी हत्तींनी माणिकवाडी क्रॉसजवळील गुंजाप्पा घाडी यांच्या भाताच्या वळींचे हत्तींनी नुकसान केले. हातातोंडाला आलेले पीक मातीमोल होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना हत्ती समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तब्बल […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील चापगाव ग्राम पंचायतीचे राजकारण सध्या तापले आहे. सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षावर अविश्वास ठराव समंत करण्याचा प्रयत्न केला, पण उच्च न्यायालयाने आजच्या (04) विशेष बैठकीला स्थगिती आदेश बजावल्याने सदस्यांचा हिरमोड झाला आहे. अध्यक्षा गंगव्वा कुरबर आणि उपध्यक्षा मालुबाई पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यासाठी आज विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. […]
नंदगड : समांतर क्रांती न्यूज पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व लाभलेल्या नंदगड येथे भव्य शिवस्फूर्ती स्थळ उभारण्याचा निर्णय आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. या शिवस्फूर्ती स्थळावर भव्य असा सिंहासणाधिस्थित छ. शिवारायांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात नंदगड येथील ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा भरणार आहे. तत्पूर्वी शिवस्फूर्ती स्थळाचे उदघाटन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु […]
कुतूहल / समांतर क्रांती जीन्स वापरणे ही फॅशन बनली आहे. 80च्या दशकात जीन्सने भरतीयावर गारुड केले आणि पारंपारिक सुती कपडावर जणू संक्रात ओढवली. जीन्सच्या पॅन्ट अबाल-वृद्धांच्या आवडीची बनली आहे. लहान असो कि मोठे, प्रत्येकाच्या जीन्स पँटच्या उजव्या खिशात आणखी एक लहान खिसा असतोच. ही केवळ फॅशन आहे कि आणखी काय? जीन्सचा वापर रशिया आणि युरोपीय […]
कोल्हापुरात शिवसेनेचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन समांतर क्रांती / कोल्हापूर हिवाळी अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी बेळगावात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याला परवानगीसाठी अर्ज करण्यात आला असला तरी जिल्हा प्रशासन चालढकल करीत आहे. गेल्या पाच – सहा वर्षांचा अनुभव पाहता परवानगी दिली जाणार नाही असे दिसते, तसे झाल्यास कर्नाटकातील वाहने सीमेवर अडवू, असा […]
खानापूर : बंगालच्या उपसागरात स्थिरवलेल्या फेंगल चक्रीवादळाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्याना बसला आहे. ऐन हिवाळ्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने खानापूर तालुक्यातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. चक्क दिवाळीपर्यंत पावसाने तालुक्याला झोडपून काढल्यानंतर आता कुठे भात कापणी आणि मळण्याना जोर आला होता. त्यात आता भेंगल वादळमुळे रविवारपासून ढगाळ वातावरण आहे. सोमवारी तालुक्याच्या काही भागात तूरळक सरी […]