समांतर क्रांती वृत्त खानापूर: शेतीत चिखल करतांना ट्रॅक्टर अंगावर पडल्याने सेवानिवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तिओली येथे घडली आहे. या घटनेत वर्षभरापूर्वीच शिक्षकी सेवेतून सेवानिवृत्त झालेले पांडुरंग लाटगावकर यांचा मृत्यू झाला असून या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की, सध्या तालुक्यात भात लागवडीची धांदल सुरू आहे. […]
समांतर क्रांती वृत्त Mhadai Arbitration extended by one year खानापूर: केंद्र सरकारने म्हादई तंटा लवादाला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. पाणी वाटप केल्यानंतर लवाद विसर्जीत केला जाणार होता. दरम्यान, गोवा सरकारच्या मागणीवरून जलशक्ती मंत्रालयाने लवादाला २० ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याची अधिसूचना जारी केली. १३ नोव्हेंबर २०१० साली लवादाची स्थापना करण्यात आली होती. मुदतवाढ […]
खानापूर : तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमधील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या 49 आणि मदतनिसांच्या 84 जागा भरण्यात येणार आहेत. पण या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना दहावीत कन्नड हा प्रथम अथवा द्वितीय विषय असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मराठी भागातील मराठी भाषिक महिला उमेदवारांवर अन्याय होणार आहे. याबाबत विचारविनिमय करून कायदेशीर दाद […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यातील चांगला रस्ता दाखवा बक्षिस मिळवा, अशी योजना तालुक्यातील लोकप्रतिनिधींसाठी आयोजित करण्याची गरज आहे. त्यासाठी विजेत्यांना हमखास ‘गावरान’ पारितोषिके देण्याची योजना प्रत्येक गावातून व्हायला हवी. असे प्रवाशांना वाटू लागले आहे. कारण, तालुक्यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्याविना नाही. बैलूरच्या रस्त्याची आवस्था तर शासनाने रस्त्यावरच तलाव योजना राबविली आहे की काय? असा प्रश्न […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: महामार्ग आणि टोल प्लाझासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणाचा तातडीने निकाल लावू असे अश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी येथील बैठकीत दिले. पण, टोल वसुलीला विरोध करू नका असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे आज सोमवारपासून गणेबैल टोल नाक्यावर टोलवसुलीला सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी तातडीने शेतकऱ्यांची आणि स्थानिक नेत्यांची बैठक येथील […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ, पाऊस नाही झाला तर सुका दुष्काळ शेतकऱ्याच्या वाट्याला येतो. सरकार चुकले तरी शेतकरीच भरडला जातो. लोंढाजवळ महामार्गावरील नव्याने बांधलेला पूल कोसळला. अतिवृष्टीमुळे पूल कोसळला हे सरकारी उत्तर असले तरी या घटनेमुळे मोहिशेतच्या शेतकऱ्यांची मात्र उपासमार होणार हे ठरलेले आहे. लोंढाजवळचा जो पूल कोसळला आहे, तो मुळातच […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: शनिवारी दुपारनंतर तालुक्याला पावसाने झोडपायला सुरूवात केली असून मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. मलप्रभा, म्हादई, काळी यासह अन्य नद्या-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा शहर आणि इतर परिसराशी संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड, रस्ते खचल्याच्या आणि झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यात सध्या पावसाने थैमान मांडले आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अशातही खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. मलप्रभा नदी काठावरील शिवारात काम करतांना पाय घसरून बैल पाण्यात पडला. या बैलाने अत्यंत जिकरीने दुथडी भरून वाहणाऱ्या आणि वेगवान प्रवाह असणाऱ्या १० कि.मी.चे अंतर पोहत जाऊन स्वत:चा जीव वाचविल्याची घटना आज रविवारी […]
समांतर क्रांती वृत्त लोंढा: नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशी खानापूर-महामार्गाची अवस्था झाली आहे. आधीच काम अर्धवट आहे, त्यात आज सकाळी लोंढाजवळील नव्याने बांधण्यात आलेला पूल कोसळला आहे. रस्त्यादेखील खचला असून वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली आहे. कंत्राटदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अंदाधुंद कारभाराचा फटका प्रवाश्यांना बसत आहे.
समांतर क्रांती / रविवारची मुलाखत अलिकडे बांधावरच्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तशीच पंचायतीच्या कार्यालयात आणि गावाच्या पारावर बसून विकासाच्या गप्पा हाणणारेही ‘पायलीस पंधरा’ मिळतील. पण, खूप कमी सदस्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पंचायतीचे कार्यालय दणाणून सोडतांनाच प्रत्यक्ष विकास कामावर हातात टिकाव आणि फावडा घेऊन कामाला लागतात. जांबोटी ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची नुकताच निवड झाली. यात जास्त चर्चेत […]